Maharashtra TET ExamMedium
Q.खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या: उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात. वसंतपंचमीच्या आसपास ह्या झाडाची सगळी पानं गळून गेलेली असतात. झाड म्हणजे नुसता खराटा दिसतं. त्या खडखडीत फांदयांतून दिसणारं निळं आभाळच अधिक बरं वाटतं. किंवा त्या निळ्या आभाळावर ह्या काळ्या करड्या रेघा मारलेल्या दिसतात. ओक्याबोक्या रेघा. पण ह्या रेघा अस्ताव्यस्त मात्र नसतात. त्या रेघांचा एक सुडौल आकार दिसतो. सुडौल पण अबोल. झाड असतं जिवंत; पण न हलणारं, न बोलणारं. सृष्टीत वसंत ऋतू पानाफुलांचं वैभव फुलवत असतो; पण पांढऱ्या चाफ्याचं झाड मात्र खंतावल्यासारखं दिसतं. वारा येतो आणि ह्याच्या अंगाशी खेळतो. पण एकही पान नसल्यानं पांढऱ्या चाफ्याचं झाड हाललं असं वाटतच नाही. सकाळी प्रसन्न अरुणोदय होतो; पण पांढऱ्या चाफ्याला कळ्या नसल्यानं हा हलल्यासारखा दिसत नाही. पावसाळ्यातलं याचं ते हिरव्या गुच्छांचं हालणं-फुलणं आठवून तर आत्ताचा त्याचा हा उदासीनपणा आपल्या मनाला खूपच खिन्न करतो. प्रश्न: पानगळती कोणत्या ऋतूत होते ?
a
ग्रीष्म
b
शरद
c
वर्षा
d
शिशिर
Correct Answer: Option D
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...