उतारा आणि आकलनMedium
Q.खालील उतारा वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या: उतारा: कुठलाही ऋतू हा निसर्गाचा सोहळाच असतो, खेडयांमध्ये, लहान गावांत ऋतुपालट लगेच कळतो पाऊस संपला की त्यातला हुरहुरता ओलावा घेऊन शरदाचे चांदणे फुलायचे. दवात भिजलेली पहाट पांघरुनच दिवाळी सरायची त्या दवबिंदूंची शिरशिरी हवीहवीशी वाटत असतानाच थंडीचा काटा बोचायला लागला की. कळायचे हेमंती वारे वाहू लागल्याचे थंडीचा हा गारवून टाकणारा अनुभव माघापर्यंत पुरायचा आणि शिशिराने गिरकी घेतली की वसंताची कळी खुलायची. फाल्गुनी हवेत रंगांची उधळण व्हायची. खरंतर संक्रांतीपासूनच एक गंध भुरळ घालायचा. तो म्हणजे आम्रमोहोराचा गंध। मोहोरानं डवरलेली आंब्याची झाडं आणि त्यावर चाळणारं कोकिळकूजन ही देखील ऋतुबदलाची नांदीच! धगधगत्या ग्रीष्माआंधीचा हा वसंत म्हणजे गंधवतीच्या सर्जनाचा बहर, गंधवती म्हणजे पृथ्वी, आपली काळी आई आणि सर्जन म्हण निर्मिती 'भरभरून देणे' हा काळया आईचा गुणधर्मच आहे. सुगीचे दिवस आणि फाल्गुनातला उल्हास यांमुळे या दिवसांत मन वाऱ्यावर लहरत असतं पतंगासारखं! प्रश्न: पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द उताऱ्यात आला आहे?
a
प्रभात
b
वाट
c
सदन
d
सखा
Correct Answer: Option A
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...