ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti.in
ParikshaNiti
Homeभारतीय अर्थव्यवस्थाकृषी अर्थव्यवस्था

हरित क्रांती आणि पीक रचना

हरित क्रांती आणि पीक रचना 1/9/2026
कृषी: हरित क्रांती आणि पीक रचना

कृषी अर्थव्यवस्था

हरित क्रांती आणि पीक रचना

१. हरित क्रांती (Green Revolution)

१९६० च्या दशकात भारतात अन्नधान्याची तीव्र टंचाई होती. भारताला अन्नासाठी अमेरिकेवर (PL-480 करार) अवलंबून राहावे लागत होते. यातून बाहेर पडण्यासाठी हरित क्रांती झाली.

  • कालावधी: १९६६ - १९६७ (खऱ्या अर्थाने सुरुवात).
  • जागतिक जनक: डॉ. नॉर्मन बोरलॉग (मेक्सिको).
  • भारतीय जनक: डॉ. एम. एस. स्वामिनाथन.
  • प्रमुख पिके: गहू (सर्वाधिक फायदा) आणि तांदूळ.

मूळ: १९६० मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ७ जिल्ह्यांत IADP (Intensive Agriculture District Programme) राबवण्यात आला होता, त्याचेच रूपांतर पुढे हरित क्रांतीत झाले.

हरित क्रांतीचे घटक (Components)

हरित क्रांती हे एक 'तंत्रज्ञानाचे पॅकेज' होते:

  1. उच्च उत्पादन देणारी बियाणे (HYV Seeds): मेक्सिकन गव्हाच्या बुटक्या जाती (उदा. कल्याण सोना, सोनालिका).
  2. सिंचन सुविधा: धरणांची निर्मिती आणि कालवे.
  3. रासायनिक खते: युरिया, फॉस्फेटचा वापर वाढवणे.
  4. कीटकनाशके: पिकांचे संरक्षणासाठी.
  5. यांत्रिकीकरण: ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरचा वापर.

हरित क्रांतीचे परिणाम

सकारात्मक (Positive) नकारात्मक (Negative)
अन्न सुरक्षा: भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. प्रादेशिक विषमता: फक्त पंजाब, हरियाणा आणि प. उत्तर प्रदेशला फायदा झाला.
उत्पादन वाढ: गव्हाचे उत्पादन प्रचंड वाढले. पीक असंतुलन: डाळी आणि तेलबियांचे उत्पादन घटले.
शेतकरी उत्पन्न: शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली. जमिनीचा ऱ्हास: अति खतांमुळे आणि पाण्यामुळे जमिनीची क्षारता वाढली.

२. भारतातील पीक हंगाम (Cropping Seasons) IMP

हवामानानुसार भारतात तीन प्रमुख कृषी हंगाम आहेत:

हंगाम पेरणी व कापणी प्रमुख पिके
१. खरीप (Kharif)
(पावसाळी हंगाम)
पेरणी: जून-जुलै (पावसाच्या सुरुवातीला)
कापणी: सप्टें-ऑक्टो
तांदूळ (भात), ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, सोयाबीन, भुईमूग.
२. रब्बी (Rabi)
(हिवाळी हंगाम)
पेरणी: ऑक्टो-नोव्हें (परतीच्या पावसावर)
कापणी: एप्रिल-मे
गहू, हरभरा (चना), मोहरी, जवस.
३. उन्हाळी (Zaid)
(मधला काळ)
काळ: मार्च ते जून टरबूज, काकडी, भाजीपाला, चारा पिके.
लक्षात ठेवा: दक्षिण भारतात हवामान उष्ण असल्याने तिथे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात 'तांदूळ' घेतला जातो.

पिकांचे वर्गीकरण (Classification of Crops)

  • अन्नधान्य पिके (Food Crops): तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, डाळी. (भारतातील ६५% पेक्षा जास्त क्षेत्रावर ही पिके घेतली जातात).
  • नगदी पिके (Cash Crops): ज्यांचा उद्देश बाजारात विकून नफा कमावणे हा असतो. उदा. ऊस, कापूस, तंबाखू, ज्यूट.
  • मळ्याची पिके (Plantation Crops): चहा, कॉफी, रबर, नारळ.
  • फलोत्पादन (Horticulture): फळे आणि फुले.

इतर कृषी क्रांत्या (Rainbow Revolution)

धवल क्रांती (White) दूध उत्पादन (वर्गिस कुरियन)
निळी क्रांती (Blue) मासेमारी (Fish)
पिवळी क्रांती (Yellow) तेलबिया / सूर्यफूल
सुवर्ण क्रांती (Golden) फळे / मध (Honey)
गोल क्रांती (Round) बटाटा

Premium Resources

Download PDF Revision Note
Watch Video Explanation